Tweet

Friday 25 May 2012

महाराष्ट्रदेशा। दुष्काळाच्या देशा।


महाराष्ट्रदेशा। दुष्काळाच्या देशा।

कविवर्यानी महाराष्ट्रदेशाची स्तुती केली आहे. त्यामध्ये एक ओळ जोडता येईल. "दुष्काळाच्या देशा।" सर्वसाधारणपणे आपणापैकी सर्वसाधारणपणे असे काही तरी म्हणून अगतिकता जाहिर करतात. "दुष्काळ तर पाचवीलाच पुजला आहे.", "पाणीच नाही तर देणार कोठून.", "दगडांमध्ये पाणी मुरणार कसे?", "टँकर तरी किती पुरवणार?" वगैरे. हे चित्र बदण्याकरिता दुर्दम्य इच्छाशक्ति, मनगटात जोर, निस्वर्थीपणा व विकासाची मानसिकता प्रथम राजकिय पुढाऱ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. ती आपोआप जनतेत झिरपेल. असे झाले तरच महाराष्ट्रदेश सुजलाम सुफलाम होईल.

Sunday 6 May 2012

वाहतुक व्यवस्था तसेच व्यवस्थापन


Dangerous Road Crossing
भारतातील सर्वच शहरांत वाहतुकही मोठी समस्या आहे. पुणे तसेच पिंपरीचिंचवड त्याला अपवाद नाही. सर्वसाधारणपणे असे समजले जाते की, वाहतुकीचे नियम बनविले व ते मोडणारांना शिक्षा केली तर शिक्षेच्या भीतीने जनता नियम पाळेल. परंतु, हा एक गैरसमज आहे. सर्वसाधारणपणे असे दिसते की, लोकांची वृत्ती नियम पाळण्याची नसते. त्यांना वटते की, वर्ष-सहा महिन्यात एखाद्या वेळेला पकडले जाण्याची शक्यता असते. जर पकडले गेलो तर पोलिसाला 50 रुपयांची एक नोट दिली की, प्रकरण मिटते. अशा परिस्थितीत नियम कितीही कडक असले तरी त्यांचा परिणाम शून्य असतो. धर्मसंस्थापकानी यावर उत्तम उपाय शोधले व देव या संकल्पनेची निर्मिती केली.

Popular Posts