Tweet

Friday 18 March 2016

Drought Hit Maharashtra 2015-16




शासन दुष्काळग्रस्तांकरिता काय करत आहे?
शासनाच्या म्हणण्याप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत केली जात आहे. काँग्रेसपक्षाच्या मते कर्जमाफी हीच मदत दिली पाहिजे. तसे पाहवयास गेले तर कोआॉपरेटिव्ह बँकाच शेतकऱ्यांना मदत करतात व त्या वाचविण्याकरिता बँकानी दिलेली कर्जे फेडली गेली पाहिजेत. थोडक्यात बँका वाचविणे महत्वाचे आहे व ते करण्याकरिता शेतकऱ्यांची कर्जे शासनाने फेडली पाहिजेत. या चष्म्यातून पाहिले तर काँग्रेसची मागणी पूर्णपणे बरोबर वाटते. परंतु, सध्या प्रथम आवश्यकता आहे, माणसे व जनावरे यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे. पुणे व मुंबईत तसेच इतर शहरात कित्येक कुटुंबप्रमुख काम शोधण्याकरिता आले आहेत. येथे त्यांना पुरेसे काम मिळत नाहीच वर शहरातील खर्च भागवून घरी काय पाठवावयाचे याची चिंता त्यांना खात आहे. यातूनच आत्महत्या सूरू होतील.

Popular Posts